जळगाव जिल्हा

गिरणेचं पाणी मन्याड धरणात सोडा- शेतकरी संघटनेची मागणी

Pachora |काँग्रेसच्या वतीने ढोल बजाव आंदोलन; ऑफलाईन रेशन वाटपाचे दिले प्रांताधिकारी यांनी आदेश

जळगाव

गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प राबवून गिरणा धरणातील पाणी मन्याड धरणात  सोडण्यासाठी शेतकरी संघटनेने आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आंदोलन केले.
गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यानंतर अतिरिक्त चे पाणी नदीपात्रातून वाहुन जाते. ते पाणी रोटेशन पध्दतीने मन्याड धरणात सोडण्यात यावे यासाठी खूप वर्षां पासून संघर्ष करावा लागत आहे.त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं,उपोषण झाली. जलसंपदा विभागाला निवेदन देऊन झाले परंतु फक्त आश्वासन शिवाय काहीच मिळाले नाही. यासोबतच मन्याड धरणाची उंची वाढवावी यासाठी देखील निवेदन तयार करून आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक तर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या यासंबंधीची निवेदन दिले. परंतु ते निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले नाही. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी अंगावर पाणी ओतत, घोषणा देत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनास शेतकरी संघटनेचे दिलीप पाटील, भीमराव जाधव, अखिलेश पाटील,सय्यद देशमुख,खुशाल सोनवणे, रामकृष्ण महाजन, संजय बोरसे, मंगेश राजपूत, देवधर मोरे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!