राज्य

गुजरातहून मुंबईला येणारी मालगाडी पालघर येथे रुळावरून घसरली

 
पालघर-

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे रुळावरून घसरली आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर मोठा परिणाम होणार आहे.

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे रुळावरून घसरली आहे. मालवाहू करणारी ही रेल्वे रुळावरून घसरली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम मोठा परिणाम होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या मालवाहू रेल्वेचे डब्बे पालघर रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले आहेत. यामुळे लोकल ट्रेनच्या व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. रेल्वे प्रशासन आणि येथील टेक्निकल टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे.

मुंबईकडे ही मालगाडी  जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असतांना अपघात घडला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे. या अपघात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डब्बे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली आहे.

घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, 2 क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!