जळगाव जिल्हा

खान्देश लवकरच होणार ब” सत्ता मुक्त-डॉ.निळकंठ पाटील


पाचोरा-

गेल्या अनेक वर्षापासून खान्देश नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील अनेक गावे ब सत्ता मध्ये आहेत.त्यामुळे ग्रामस्थ खरेदी ना,विक्री करू शकत होते.या संदर्भात अडचणी समजून घेत डॉ.निळकंठ पाटील यांनी प्रत्यक्ष काही गावात जाऊन या बाबत अनुभव घेतला आणि त्यांनी मा. उपमुख्यमंत्री देविंद्र फडणवीस यांना विंनती पत्र सादर केले होते,४० गावे,पाचोरा भडगाव तालुक्यातील यांना ब सत्ता मधून वगळण्यास सांगितले एव्हडेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र ब सत्ता मधून काढावा.तसेच १५% लागणारा सरकारी नजरानाही बाद करावा अशी विनंती निवेदनाद्वारे डॉ.निळकंठ पाटील यांनी केली होते. त्याची प्रचीती अशी की लगेच मराठवाडा ब सत्ता मधून काढण्याचा प्रस्ताव घेतल्याची बातमी आली.पाचोरा तालुक्यातील गावे.कळमसरा,कुरंगी,कुऱ्हाड खु,गाळण बु,तारखेडा खु,तारखेडा बु,नांद्रा,पाचोरा,पिंपळगाव बु,बाळद बु,बांबरुड राणीचे,भोकरी,माहेजी,लासगाव,लोहटार लोहारा,लोहारी खु,वडगाव आंबे,शिंदाड,सातगाव डोंगरी,,सामनेर,भडगाव तालुका आमडदे,आंचळगाव,कजगाव,खेडगाव,गिरड,गुढे,गोंडगाव,जुवार्डी,कोळगाव,टोनगाव,पिंपरखेड,पिंपळगाव बु,बांबरुड प्र भ,भडगाव,महिंदळे,वडजी,वडगाव खु,वाडे,शिंदी या गावांची यादी ही सादर केली. या बाबत डॉ.निळकंठ पाटील यांनी माध्यमांना कळविले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!