राज्य

मुंबई गोरेगावातील अग्नितांडव ५ मजली इमारतीला भीषण आग! ७जणांचा मृत्यू,अनेक जखमी.



मुंबई-


मुंबई गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात समर्थ नावाची पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली.


बघता बघता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. यामध्ये इमारतीत राहणारे अनेक नागरिक जखमी झाले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आगीत होरपळलेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ५ महिला आणि २ पुरुषांचा मृत्यू झाला. अजूनही ४० जणांवर उपचार सुरू असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!