गोवंश हत्या प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करावी,विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन..

पाचोरा-
बकरी ईद मध्ये गोवंश हत्या होवू नये, याकरीता पोलीस प्रशासनाने उपाययोजना करावी या अनुषंगाने पाचोरा विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे, सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू आहे. परंतु अद्यापही बदलापूर, पडघा (भिवंडी) मालेगाव जि.नाशिक , छत्रपती संभाजीनगर, सातारा, धूळे, धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीड, जालना या जिल्हांमध्ये गोवंश हत्या तसेच तेलंगणा तथा कर्नाटक राज्याच्या सिमेवर मोठ्याप्रमाणावर गोवंशी तक्सरी होत असल्याचे व गोरक्षक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याबाबत सदरच्या निवेदनात नमूद केले आहे.

तसेच ७ जून २०२५ रोजी ‘बकरी ईद’ निमित्त मोठ्याप्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता असल्याने गोवंश हत्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. तरी आपण त्या बाबत उपाययोजना करावी.तसेच पाचोरा शहर व ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात गोवंश हत्येसाठी तस्करी होत असून कृषी उत्पन्न बाजार समिती वरखेडी तालुका पाचोरा येथे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीसाठी खरेदी केली जात आहे. तरी पोलीस प्रशासनाने यावर लक्ष घालून गोवंश हत्या बंद करण्यास मदत करावी.या आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी विश्वहिंदु परीषदचे प्रखंड मंत्री, योगेश सोनार बजरंग दल प्रखंड संयोजक, बंटी पाटिल,
विहिप प्रखंड गोरक्षा प्रमुख, राहुल मधुकर पाटील,
विहिप प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटिल, गौरव पाटिल, जीतू लोणारी, बंडु पांचाल, सोपान शिंपी, जय बागुल,आकाश पाटिल, रोहित पाटील, गोकुल पाटिल, दक्ष पाटिल, दिनेश भोई, प्रमोद वाघ, हे उपस्थित होते.