जळगाव जिल्हा
जळगाव पाळधी बायपास रस्त्यावर लागल्या वाहनांच्या रांगा पर्यायी रस्त्यावर पाणीच पाणी..
एरंडोल (प्रतिनिधी जयनुल शेख)
दि.२४/०९/२०२३
एरंडोल जळगाव बायपास रस्त्यावर पाळधी गावानजीक बायपास रस्त्याचे पुलाचे काम सुरू आहे. म्हणुन पुलाचे काम पुर्ण होईल तो पर्यंत पर्यायी मार्ग पुला खालुन वाहनांसाठी करण्यात आला आहे मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली असुन दुरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
वाहत्या पाण्यातुन मोठी कसरत करत वाहने काढत आहेत.
या संबधीत ठेकेदार यांनी या वर काही पर्याय काढून त्या पाण्याचा बंदोबस्त करावा या वाहत्या पाण्यामुळे ग्रामस्थांसह वाहनधारकांना आपले वाहन त्या ठिकाण्याहून काढणे जिकरीचे ठरत आहे.

तरी या संबंधीत जे कोणी ठेकेदार असतील त्यांनी हि समस्या लवकरात लवकर सोडावी अशी मागणी होत आहे.