जळगाव जिल्हा

पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील ८० जणांना विषबाधा


जळगाव-

पाणीपुरी खाणं हे जळगावातील तब्बल ८० जणांना चांगलेच महागात पडलं आहे. जळगावातील चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव गावातील नागरिकांनी पाणीपुरीचा स्वाद घेतला. मात्र ते त्यांच्या अंगलट आलं त्यामुळे त्यातील ८० जाणांना विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांना  उलट्या, जुलाब आणि पोटदुखीसारखा त्रास त्यांना जाणवू लागला आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या सर्वांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार चोपडा गावात आठवडी बाजार सुरू होता. त्यावेळी नागरिक पाणीपुरीवर ताव मारत होते. तेव्हा आजूबाजूच्या गावातील नागरिक आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी आले होते. पाणीपुरीचा आस्वाद घेतलेल्या अनेकांना मंगळवारी उलट्या, जुलाब आणि पोट दुखण्याचा त्रास झाला असून आतापर्यंत जवळपास ८० रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहानग्यांची सर्वाधिक संख्या आहे.

त्यानंतर ७० पैकी ३० रूग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रूग्णालयात तसेच इतर रूग्ण खासगी व जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. रात्री सुमारे १० रूग्णांवर अडावद येते उपचार सुरू होते. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी राहणार पिंप्री यांनी पोलीस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे.

सदर  घटनेची दखल ही शिवसेनेचे आमदार लता सोनवणेंनी घेतली. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी रूग्णांची विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत रूग्णालयातील वैद्यकीय आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या कर्मचाऱ्यांना उपचार देण्याची सूचना देण्यात आल्या होत्या

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!