१लाख५४ हजार रुपयाचा मुद्देमाल,जलपरी पाण्याचा दोन मोटारी, २८ मोबाईल संच जप्त;नंदुरबार शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

नंदुरबार-
नंदुरबार पोलीस अधिक्षक मा. श्री. श्रवण दत्त यांनी नंदुरबार शहरात वाढलेल्या मोबाईल चोरी प्रकारामुळे कडक उपाय योजना करणे बाबत आदेशीत केले. त्या अनुषंगाने मा.श्री. संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार यांचे मार्गदर्शना खाली श्री. वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, नंदुरबार शहर पोलीस ठाणे व त्यांचे अधिनस्थ पोलीस तपास पथक तपास करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन हितेश उत्तम कोळी, रा. कोळदा यास पातोंडा गावाचे शिवारात असलेल्या टोयाटो शोरुम समोरुन ताब्यात घेवुन त्याची दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक OPPO कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला त्यास सदर मोबाईल हा कोणाचे मालकीचा आहे व मोबाईलची खरेदी बील पावती आहे, का विचारले असता त्याने त्या बाबत काहीही एक उपयुक्त माहिती दिली नाही. म्हणुन त्याचे विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणेला दिनांक ०५/०७/२०२४ रोजी गु.र.नं.४१५/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा नोंद केला.
त्या अनुषंगाने संशयीत हितेश कोळी यास अधिक विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार १) गोपाल संतोष कोळी, २) महेश प्रल्हाद कोळी यांचेसह कोळदा गाव शिवारातून एक विहीरीतून पाण्याची जलपरी मोटार दोन दिवासा पूर्वी चोरी केल्याचे सांगितले. त्या प्रमाणे संशयीत गोपाल संतोष कोळी व महेश प्रल्हाद कोळी दोन्ही रा. कोळदा यांना त्यांचे राहते गावी शोध घेवून आणले त्यांचा साथिदार हितेश कोळी अशांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी पळाशी शिवारतुन देखील एका शेतातून पाण्याची मोटार चोरी केल्याचे असल्याचे सांगितल्या वरुन एकूण १५,५००/-
रुपयाच्या दोन जलपरी पाण्याच्या मोटार व ८४,५००/-रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीची एकुण १० मोबाईल संच ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नंदुरबार शहरात भोई गल्ली येथे राहणारा अक्षय छगन खेडकर, यास देखील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी नंदुरबार शहरातील परिसरात मिळून आल्याने ताब्यात असलेल्या एका बॅग मधून एकुण ५४,०००/-रु.कि.चे वेगवेगळ्या कंपनीचे १८ मोबाईल संच मिळून आले. त्याने देखील सदर मोबाईलच्या मालकी हक्का बाबत पोलीसांना समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याचे विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणे दिनांक ०५/०७/२०२४ रोजी
गु.र.नं.-४१६/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे जलपरी पाण्याची मोटार चोरी बाबत गु.र.नं. २०२/२०२४ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद असल्याने आरोपी १) हितेश उत्तम कोळी २) गोपाल संतोष कोळी, दोन्ही रा. कोळदा, ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवुन अटक केली आहे. सदरची कारवाई ही नंदुरचार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रवण दत्त साो., यांचे आदेशान्वये व नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. संजय महाजन साो. यांचे मार्गदर्शाना खाली पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले व गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ विनोद जाधव, दिपक गोरे, जगदीश पवार, राजेश येलवे, पोना/बलविंद्र ईशी, नरेंद्र चौधरी, स्वप्निल पगारे, पोकी/किरण मोरे, हरेष कोळी, संदिप सदाराव, विशाल मराठे, कल्पेश रामटेके, युवराज राठोड, अनिल बडे या पथकाने केली आहे.