कुरंगी येथे जेष्ठ नागरिक कार्यशाळा संपन्न.

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव हरेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने”एक दिवशीय ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ज्ञ.MBBS DOrtho )यांनी उतारवयातील विविध समस्ये विषयक माहिती दिली.ते बोलताना म्हणाले जसे जसे वयाची वाढ़ होते.तसेच विविध शारीरिक त्रास गुडघे,सांधे दुःखी, पोटाचे विकार यासाठी योग्य तो सकस हलका आहार घेणे गरजेचे आहे. पचन संस्था मजबूत होण्यासाठी सकाळी सकाळी ब्रश न करता पाणी प्यावे. (अल्काईन) लाळ पोटात गेल्यामुळे कुठलीही आरोग्य विषयक समस्या जाणवत नाही शरीर निरोगी असते. जेवणा नंतर शतपावली करणे. यामुळे पोटाचे तसेच पचन क्रिया व्यवस्थित असते. रात्रीचे जेवण आणि झोपण्याचे किमान 4 तास अंतर असावे. गहू ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीची, भाकरी खावी ई. दररोजचा व्यायाम ई. विषयावर मार्गदर्शन केले.

मी आणि माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा या वर प्रा. विकास माळूकर (एम ए. बी. एड.) कुटुंब संस्कार आजी आजोबांना आजच्या पिढीला आजी बाबा नकोय. का?पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था होती यात एकमेकांचे सुख-दु:ख वाटल्या जात होते. माझ्या मुलीला मुलगी सून म्हणून येणार तिचाही स्वीकार त्या-त्या कुटुंबातील सदस्यांनी करावा. परंतु लग्न झाल्यानंतर मुलींना मुलाचे आई बाबा नको असतात. शिवाय नवरा बायको एवढाच परिवार अपेक्षीत असते.आध्यत्मिक व ज्येष्ठांचे संस्कार नसल्यामुळे त्याचा परिणाम आज वृद्धाश्रम सारख्या केंद्राची निर्मिती होत आहे. लहानपणा पासूनच संस्कार क्षम पिढी घडविण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे. कुटुंबात एकमेकांना समजून घेणे. उतार वयातील विविध समस्या मनातील विविध प्रश्नोत्तरे समाधान करण्यात आले.सचिन लोहार यांनी विविध खेळ घेऊन योग विषयी चर्चा तसेच तुकाराम मिस्त्री यांनी संवाद साधला.शेवटी अशा कार्यशाळा विषयक माहिती संस्थे मार्फत आम्हाला कळवावी. हेही सर्व आजी बाबांनी सांगितले. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने प्रौढ (आजी बाबा ) उपस्थित होते . कार्यशाळा सूत्रसंचालन सचिन खैरे तसेच नियोजन प्रसाद लोखंडे यांनी केले.
